लगीनघाई, पाणीटंचाई, उन्हाच्या तीव्रतेने जीवाची होते लाही…लाही…..

लगीनघाई, पाणीटंचाई, उन्हाच्या तीव्रतेने जीवाची होते लाही…लाही…..
*************
भोकर( बी. आर. पांचाळ ) मे महिना सूर्यआगओकतोय…… लग्न तिथी…. सगळीकडे लगीन घाई…गावागावात पाणीटंचाई…….. या साऱ्या घडामोडीमुळे नागरिक मात्र त्रस्त झालेले आहेत… एकाच वेळी साऱ्या गोष्टी होत असल्याने मानवी जीवाची मात्र लाही….. लाही…. होताना दिसत आहे.
एप्रिल मे महिन्यात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सकाळी दहा वाजताच सूर्य किरणांची तीव्रता भासू लागली,दुपारी बारा वाजल्यानंतर घराच्या बाहेर निघणे देखील अवघड झाले, सायंकाळी सहा वाजल्यानंतरच उन्हाची तीव्रता कमी होत आहे. अशामध्येच लगीन घाई लग्नाच्या तिथी देखील आहेत दुपारी बारा वाजल्यानंतर लग्नाची वेळ असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना मात्र कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे, बाहेर गावाहून येणाऱ्या पाहुण्यांना प्रवासामध्ये होणारा त्रास उन्हाची तीव्रता सहन होत नाही तरीही लग्न सोहळ्यांना जावेच लागते, लगीन घरी सुद्धा ऊन्हाच्या तीव्रतेचा परिणाम जाणवत आहे, आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था करणे सर्वांसाठी थंड पाण्याची सोय करणे, बसण्यासाठी जागा करणे अशा अनेक गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते, विवाह सोहळा आटोपल्यानंतर जेवणाची व्यवस्था तिथे लागणारे साहित्य आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणे अशी सगळी धांदलच उडालेली असते
तीव्र पाणीटंचाईचा लग्न समारंभावर होतोआहे परिणाम
**************
उन्हाच्या तीव्रतेने मानवी जीवनावर मोठा परिणाम झालेला आहे जनजीवन विस्कळीत झालेले आहे अनेकांना ऊन्हाचा तडाखा बसला तर दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत त्यातच गावागावात असणारी पाणीटंचाई फार मोठी समस्या निर्माण झाली आहे, काही गावांना तर कोसोदूर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे, गावातील विहिरी बोअर आटलेले आहेत, टँकरचे पाणी वेळेवर मिळत नाही पाण्यासाठी मोठी सर्वांची धांदल उडाली आहे, उन्हाची तीव्रता पाणीटंचाई त्यातच लगीन घाई अशा सर्व अडचणीमुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत, वाढलेली उन्हाची तीव्रता मात्र साऱ्याच गोष्टीवर परिणाम करीत आहे.