काश्मीरमधील हल्ल्याचा निषेध; अतिरेक्यांना भरचौकात फाशी देण्याची मागणी

काश्मीरमधील हल्ल्याचा निषेध; अतिरेक्यांना भरचौकात फाशी देण्याची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी : पहलगाम (काश्मीर) येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा कोल्हापुरात जाहीर निषेध करण्यात आला. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना भरचौकात फाशी देण्यात यावी, अशी ठाम मागणी ग्राहक समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसाठी समितीने एक निवेदन करवीरचे नायब तहसीलदार श्री. भालचंद्र यादव यांच्याकडे सादर केले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. तानाजीराव गुंड, महाराष्ट्र अध्यक्ष श्री. मुश्ताक मिस्त्री, उपाध्यक्ष श्री. मनोहर लोहार, महाराष्ट्र संघटक श्री. कुमार पाटील, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. दगडू खोतसाहेब (आप्पा), महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रोहिणी पराडकर, कोल्हापूर महिला अध्यक्षा सौ. अपर्णा पाटील यांच्यासह अमोल पराडकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
समितीने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, अतिरेक्यांना कठोर शासन व्हावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.