राष्ट्रसंतांचे विचार गावागावातून रुजावे- प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे

राष्ट्रसंतांचे विचार गावागावातून रुजावे- प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे
**********
भोकर( तालुका प्रतिनिधी) ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना अर्पण केली त्याची उजळणी व्हावी म्हणून गावागावात ग्राम जयंती साजरी होत आहे त्या माध्यमातून त्यांचे विचार गावागावात रुजावे असे विचार मुख्यमंत्री कार्यालय मुंबईचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी भोकर येथील ग्राम जयंती सोहळ्यात बोलताना मांडले.
भोकर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक समिती आश्रमात ग्राम जयंती निमित्त 26 एप्रिल रोजी रात्री सामुदायिक प्रार्थना त्यानंतर भजन व शीतल ताई यांचे राष्ट्रीय कीर्तन झाले 27 एप्रिल रोजी सकाळी सामुदायिक ध्यान रामधून व सकाळी नऊ वाजता समारोपीय कार्यक्रमात तालुक्यातील हाडोळी,नागापूर, सोनारी, कांडली, नांदा ग्राम पंचायतीचे सरपंच यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे म्हणाले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने चालणारी गावे समृद्ध झाली आहेत गावातील संघटन एकता वृक्षारोपण जलसंवर्धन अशी कामे गावात प्रामुख्याने करण्यात आली राष्ट्रसंतांच्या विचाराची चळवळ वाढत गेली पाहिजे शेतकरी सुखी व स्वावलंबी व्हावा अशी राष्ट्रसंतांची विचारधारा होती ग्रामजयंती तालुक्यात महोत्सव घेण्यात आला आहे अत्यंत महत्त्वाची बाब असून युवकांमध्येही ग्रामगीतेची प्रेरणा रुजली पाहिजे व्यसनमुक्त गाव झाले पाहिजे या तालुक्यात राष्ट्रसंतांच्या विचाराचा वारसा आहे म्हणून त्याची जपणूक सर्वांनी करावी असेही आवाहन शेवटी खंदारे यांनी केले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार विनोद गुंडमवार, समितीचे अध्यक्ष बापूराव पाटील सोनारीकर, समितीचे संचालक भगवानराव दंडवे, उपसभापती बालाजी शानमवाड, सुभाष पा. कोळगावकर, शुभांगी ताई,शितलताई, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष आलेवाड संचालक उज्वल केसराळे, प्रकाश मामा कोंडलवार, प्रा. व्यंकट माने, सरपंच माधवराव अमृतवाड, शंकरराव देशमुख, व्यंकटेश मारकवार, शेषराव पाटील, ज्ञानेश्वर माऊली, हनमनलू बडगर, गणेश गुरुजी दुमलवाड, अवधूत राजुरे यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार सहसचिव बी.आर.पांचाळ यांनी केले