भोकर मध्ये” गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार” मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ

भोकर मध्ये” गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार” मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ
***************
जलसमृद्ध भोकर अभियान उपक्रम
********************
सुपीक शेतीसाठी मिळणार शेतकऱ्यांना गाळ
*************
भोकर तालुका प्रतिनिधी : धरणामध्ये साचलेला गाळ काढून टाकल्यामुळे पाणी साठ्यामध्ये वाढ होते त्यातून निघणारा गाळ शेतीला उपयुक्त ठरतो म्हणून शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हे अभियान सुरू केले असून भोकर येथील सुधा प्रकल्प मधील गाळ काढण्याचा शुभारंभ 27 मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
धरणे नाले नदी तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचून बसला आहे त्यामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता कमी झाली धरणातील गाळ काढला तर पाणी साठवण क्षमता वाढू शकते यासाठी शासनाच्या वतीने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हे अभियान मागील वर्षीपासून सुरू करण्यात आले आहे चालू वर्षी देखील हे अभियान राबविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून रेनापुर सुधा ब्रहद लघुपट बंधारे तलाव उत्खनन मोहीम 2025 बाबळी बंधारे उपविभाग उमरी यांच्यामार्फत हे काम करण्यात येणार आहे या कामांचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत 27 मार्च रोजी करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार विनोद गुंडमवार,उपअभियंता प्रशांत कदम, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव मंडळ अधिकारी खंदारे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते
मोहिमेचा शेतकऱ्यांना होणार फायदा
**************
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या मोहिमेमुळे धरणातील गाळ निघून पाणी साठवण क्षमता वाढणार आहे मागील वर्षी या मोहिमेअंतर्गत सुधा प्रकल्पातील काळा काढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण क्षमता वाढली होती चालू वर्षे देखील या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी सुपीक असा गाळ मिळणार आहे यंत्राच्या साह्याने गाळ काढून घेऊन शेतकरी आपल्या शेतात टाकू शकतात शेतीसाठी हा गाळ सुपीक मानल्या जातो शेतकऱ्यांनी तलावातील गाळ काढून नेऊन आपल्या शेतीमध्ये टाकावा असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गाळ काढून नेण्यासाठी उस्फूर्तपणे सुरुवात केली आहे