सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रधार्मिक वार्तासामाजिक कार्य

मानवतला प्रस्थानत्रयी ज्ञानयज्ञाचे आयोजन

मानवतला प्रस्थानत्रयी ज्ञानयज्ञाचे आयोजन

मानवत सौ ममता चिद्रवार: स्वामी दिव्यानंद पुरी महाराज यांच्या जयंती निमित्ताने चैतन्योदय गुरुकुल आश्रम जिंतूर च्या वतीने मंगळवार ता 18 पासून येथील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात प्रस्थानत्रयी ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार ता 27 पर्यंत चालणाऱ्या या ज्ञानयज्ञात दररोज सकाळी साडेसहा वाजता शांतीपाठ व विष्णुसहस्रनाम, सकाळी 7 ते 10 व दुपारी 3 ते 5 या वेळेत प्रवचन व सायंकाळी 6 ते 7 शिवमहिम्नस्तोत्र पाठाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील ज्ञानयज्ञात स्वामी मनीषानंद पुरी महाराज मानवत व स्वामी मनीषानंद महाराज चांडगाव यांचे श्रीमद् भगवदगीता, स्वामी हरीशानंद पुरी महाराज टाकळगव्हाण व स्वामी ज्ञानानंदजी महाराज दिल्ली यांचे ब्रह्मसूत्र या विषयावर तर स्वामी ज्ञान चैतन्य महाराज काशी यांचे उपनिषदावर प्रवचन होणार आहे.
या ज्ञानयज्ञात स्वामी कृष्ण चैतन्य पुरी निळकंठेश्वर, स्वामी हरि चैतन्यानंद सरस्वती पळसखेड, स्वामी रसानंद पुरी दिव्यानंद धाम, भारती चैतन्य महाराज दिव्यानुभूती केंद्र, महामंडलेश्वर स्वामी महिंद्रानंद सरस्वती, वेदांताचार्य शिवेंद्र चैतन्य महाराज यांची वाकपुष्पार्चणा होणार आहे.
ज्ञान यज्ञामध्ये ज्ञानेश्वर मोरे, स्वामी दिव्यानंद आश्रम, मनोहर शहाणे, रामकिशन देशमाने, श्री घनचक्कर, लक्ष्मीनिवास काबरा, संजय हिबारे, गजानन कुलकर्णी, दत्तात्रय दहे, दशरथ कुसुंदल व सुधाकर वट्टमवार हे अन्नदानाची सेवा देणार आहेत.
प्रस्थानत्रयी ज्ञानयज्ञास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक स्वामी महेशानंद पुरी महाराज जिंतूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button