लोक कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवरायांचे मंत्रिमंडळ होते- प्रा. नितीन बानगुडे पाटील

लोक कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवरायांचे मंत्रिमंडळ होते- प्रा. नितीन बानगुडे पाटील
******************
भोकर( तालुका प्रतिनिधी) छत्रपती शिवरायांचे राजकारण मूल्यावर आधारित होते, लहान बालकांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले लोक कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी त्यांचे मंत्रिमंडळ होते अनेक संकटावर मात करत त्यांनी संघर्ष केला जगात त्यांच्या शौर्याची गाथा गायली जाते असे महत्त्वपूर्ण विचार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी भोकर येथील जयंती सोहळ्यात बोलताना मांडले.
भोकर येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने 3 एप्रिल 2025 रोजी शिवजयंती निमित्ताने मोंढा मैदानावर रात्री 8 वा. व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानी पिंपळगाव दत्त संस्थानचे प.पू. बालयोगी व्यंकट स्वामी महाराज हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भोकर येथील श्रीकृष्ण मंदिर संस्थानचे महंत प्रभाकर बाबा कपाटे होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक जयंती मंडळाचे अध्यक्ष आनंद पा. सिंधीकर यांनी केले यावेळीपुढे बोलताना प्रा. नितीन बानगुडे पाटील म्हणाले जगात सर्वाधिक पुतळे छत्रपती शिवरायांचे आहेत, 350 वर्षांपूर्वी त्यांनी परस्त्री मातेसमान मानली त्यांच्या कार्याची ऊर्जा पिढ्यान पिढ्या मिळत आहे,तोकडं सैन्य असताना सुद्धा शून्यातून स्वराज्याची निर्मिती केली, आदिलशाही, मोगल शाही, निजामशाही मोडून काढण्यासाठी लढत राहिले, रयतेसाठी शेतकऱ्यांसाठी राज्य केलं धरणे बांधली, पाणी आडवा पाणी जिरवा मोहिम राबविली, आरमार निर्माण केलं, त्यांच्या काळात भयंकर दुष्काळ असताना सुद्धा एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही, जनतेवरील सगळे कर रद्द केले, अर्थव्यवस्था गतिमान केली, सैनिकाच्या पाल्यांना शिक्षण दिले, भगव्या ध्वजाचा सन्मान केला भगवा म्हणजे कृष्ण राम शिव वारकरी संप्रदाय यांचा आहे, अठरा पगड जातींच्या लोकांचे राज्य असावं, निपक्ष न्याय देणारं राज्य असावं असा त्यांचा ध्यास होता, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, इतिहास, भूगोल आदी विषयांचा प्रचंड अभ्यास त्यांना होता भेदभाव रहित व स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून देणारे त्यांचे राज्य होते नव्या पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा असेही ते शेवटी म्हणाले अध्यक्षीय समारोपात प.पू. बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी शिवरायांचे चरित्र युवकांनी आचरणात आणले पाहिजे असे विचार मांडले या कार्यक्रमास शिवाजी पा. किन्हाळकर, सुभाष पा. किन्हाळकर, प्रकाश देशमुख भोशीकर, प्रकाश मामा कोंडलवार, इंजि. विश्वंभर पवार, पप्पू पा. कोंढेकर, प्रा. व्यंकट माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती, जयंती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले जयंती मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक रक्तदान शिबिर दीपोत्सव आदी कार्यक्रम घेण्यात आले.