सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशेती विषयी

भोकर तालुक्यातील अनेक वाडी तांड्यावरील गावे तहानलेली ..सोसाव्या लागतात तीव्र पाणीटंचाईच्या झळा

भोकर तालुक्यातील अनेक वाडी तांड्यावरील गावे तहानलेली ..सोसाव्या लागतात तीव्र पाणीटंचाईच्या झळा
*************

भोकर(बी.आर.पांचाळ) एप्रिल महिन्यापासून उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी पाणीटंचाईचे संकट उभे टाकले, काही गावांना पाण्यासाठी कोसोदूर पायपीट करावी लागते तर काही गावांमध्ये रात्र जागून काढावी लागते, टँकरने येणारे पाणी गावाला पुरत नाही,अधिग्रहण केलेल्या विहिरी बोअर आटले आहेत तालुक्यातील 37 गावे पाण्यासाठी तहानलेली असून मे महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे.
दहा वर्षांपूर्वी टँकरमुक्त झालेल्या भोकर तालुक्यात पुन्हा टँकरची गरज भासली आहे, जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे विहिरी तलाव नद्यांची पाणी पातळी वाढली होती, हिरव्यागार बागा फुलल्या होत्या, नद्या, तलाव, नाले देखील भरून होते मात्र त्यानंतर पुन्हा जलसंधारणाची कामे झाली नाहीत पाणी आडले नाही जिरले नाही म्हणूनच चालू वर्षी भोकर तालुक्यातील37 गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, पाण्यासाठी महिलांना रात्र जागून काढावी लागते तर काही गावात कोसो दूर पायपीट करावी लागत आहे, टँकर साठी मोठी गर्दी गावात होत आहे अधिग्रहण केलेल्या विहीर व बोअरला पाणी नाही, टँकरचे पाणी अनेक गावांना पुरत नाही.

टंचाई निवारनार्थ 3 कोटी 60 लाखाचाआराखडा: पाणी मिळेना 

भोकर तालुक्याच्या पाणीटंचाई निवारणार्थ शासनाने 3 कोटी 60 लाख रुपये खर्चाचा पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर केला आहे त्यामध्ये नवीन विंधन विहिरी घेणे, विंधन विहिरींची दुरुस्ती, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विहीर बोअर, अधिग्रहण टँकरद्वारे पाणीपुरवठा अशा योजनांचा समावेश आहे मात्र मंजूर झालेल्या योजना वेळेवर होत नाही त्यामुळे अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे कायमस्वरूपी उपाययोजना नसल्यामुळे दरवर्षीच पाणीटंचाई जाणवत आहे मंजूर झालेली कामे पूर्ण होईपर्यंत जून महिना येतो त्याचा फायदा मात्र टंचाईसाठी होत नाही.

37 गावे तहानलेली: कोसो दूर करावी लागते पायपीट

भोकर तालुक्यातील जाकापूर आणि मालदरीतांडा येथे टँकर सुरू करण्यात आलेले आहे मात्र टँकरच्या पाण्यासाठी मोठी गर्दी होत असून भांडणे देखील होत आहेत टँकरचे पाणी गावांना पुरत नाही आणखी टँकर वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोमनाळा, सोसायटी तांडा, धावरी बु., चिंचाळा, सोनारी, भूर्भुशी, पांडुरंना, धावरी बु. बोरवाडी, शिवनगर तांडा, जगराम तांडा, पाकीतांडा, हसापूर, कामनगाव, दिवशी, मोखंडी,देवठाणा, देवठाणा तांडा, डोरवाडी, बल्लाळ, मसाईनगर तांडा, मसलगा, अमृनाईक तांडा, कासारपेठ तांडा, पोमनाळा, किनी, पाळज, गारगोटवाडी (दि ) डौर आदी 37 गावाचा पाणीटंचाई असून 17 गावामध्ये टँकर मंजूर करण्यात आले आहेत तर 20 गावे टँकरच्या प्रतीक्षेत आहेत

पोमनाळा गावात 20 दिवसाला गल्लीला मिळते पाणी

पोमनाळा येथील ग्रामस्थांनी उपोषण करून जानेवारी महिन्यापासूनच गावात पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी केली होती मात्र शासनाला वेळेवर जाग आली नाही, त्यानंतर पुन्हा उपोषण करण्यात आल्याने विहीर अधिग्रहण करण्यात आले मात्र पाणी अपुरे पडत आहे20 दिवसाला एका गल्लीला पाणी मिळते ग्रामस्थांना जिथे मिळेल तिथून डोक्यावर घागर घेऊन महिलांना देखील लांब अंतरावरून पाणी आणावे लागते जाकापूर, गारगोटवाडी( दि) या ठिकाणी सुद्धा महिलांचे हाल होत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button