वाचन संकल्प महाराष्ट्राचा” कार्यक्रमाचा समारोप

वाचन संकल्प महाराष्ट्राचा” कार्यक्रमाचा समारोप
वसमत. प्रतिनिधी.महाराष्ट्र शासनाच्या सुचनेनुसार, बहिर्जी स्मारक महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे आयोजित “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमांतर्गत दररोज 01जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान वेगवेगळ्या स्पर्धा जसे की सामूहिक वाचन, ग्रंथ प्रदर्शन, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, प्रकट वाचन स्पर्धा, ग्रंथालय सहल, चित्रकला स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, पुस्तक परीक्षण निबंध, वाचन कौशल्य कार्यशाळा, इत्यादी स्पर्धा या उपक्रमात घेण्यात आल्या. त्यातील सिनियर व ज्युनियर महाविद्यालयाच्या स्पर्धकांना बक्षीस वितरण व समारोप असा कार्यक्रम दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता.
यात विशेष म्हणजे “कवी/ लेखक आपल्या भेटीला” हा कार्यक्रम ठेवण्यात आला त्यामुळे येथील योगानंद महाविद्यालयाचे सुप्रसिद्ध लेखक व कवी प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक सुप्रसिद्ध कवी प्रा. पंजाब अंभोरे सर हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मा.मा. जाधव तसेच मराठी विभाग प्रमुख डॉ.बी. बी. खंदारे व एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी डॉ. श्रीकांत गावंडे सर , ग्रंथपाल डॉ.सविता आवचार इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
मान्यवरांनी प्रथम हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांचा स्वागत समारोहा नंतर ग्रंथपाल डॉ. आवचार मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर प्राध्यापक अंभोरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या कविता गाऊन दाखवल्या त्यामुळे उपस्थित सर्व शिक्षक विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले व वाचनाची सवय लावून घ्यावी व आपली लिखाण शैली विकसित करावी तसेच कुठले ग्रंथ वाचावे याबद्दल भरपूर माहिती दिली. वाचनाने आपले आयुष्य सुधारते, वाचनाने माणसाची प्रगती होते, वाचनानेच माणूस म्हणून आपण चांगले घडू शकतो असे मोलाचे मार्गदर्शन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी व उपस्थित सर्व प्राध्यापक, मंचावरील सर्व मान्यवर यांनी “वाचन संकल्प शपथ” घेतली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. मा.मा. जाधव यांनी विद्यार्थ्यांना वाचनाने माणूस कसा घडतो, वाचन सवयीचे फायदे, वाचनाचे प्रकार यावर सखोल मार्गदर्शन केले. प्रत्येकाने दररोज निदान एक तास तरी वाचन करावे असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका ग्रंथालयीन कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या समितीच्या सर्व सदस्य प्रा. डॉ. शारदा कदम मॅडम, प्रा.डॉ. रजिया शेख मॅडम, प्रा. डॉ. रेविता कावळे मॅडम, प्रा. डॉ. स्वाती पाटील मॅडम, प्रा. डॉ. ज्योती शिंदे मॅडम, प्रा. वैशाली कोसकेवार मॅडम, प्रा. प्रतिभा खंदारे मॅडम, प्रा. डॉ.एस.एन. क्षीरसागर सर, प्रा. डॉ. एस. एस. भालेराव सर, प्रा. डॉ. अशोक कुलकर्णी सर, प्रा. डॉ. रामचंद्र कुमावत सर, प्रा. पवार सर, प्रा. हेमंत आकोशकर, प्रा. राम कदम सर, प्रा. किशोर देशमुख सर, प्रा. चौरे सर, प्रा. परवरे सर,अनिल पंडित, सर्वांच्या सहकार्यातून व तसेच ग्रंथालयातील सर्व कर्मचारी श्री पंडित गोरे, श्री.राजु गुंजकर, श्री.अंजेश फोपसे, श्री.अविनाश सोनवणे, श्री.शिवाजी कदम, श्रीमती रेणुका मगर, राधा कदम इत्यादी सर्व ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांनी 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत खुप परिश्रम केले, त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने व विद्यार्थिनी समीक्षा कदम, सानिका मगर, सुनिता चोपडे, संस्कृती डांगे, नेहा जमरे, स्नेहा बारहाते, अनिकेत सोनटक्के, कपिल कदम, कन्हैया कल्याणकर, सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने तसेच विद्यार्थ्यांचा प्रत्येक स्पर्धेत उपक्रमात ग्रंथालय सहलीत उत्स्फूर्त सहभाग लाभल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.
कार्यक्रमानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहाला भेट दिली यावेळी विद्यार्थ्यीनिंनी तयार केलेल्या राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या भित्तिपत्रकाचे विमोचन केले तसेच वसतिगृहातील सोयी सुविधा पाहुन समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ अनिल मुगुटकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ शारदा कदम यांनी केले.