सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशेती विषयीसामाजिक कार्य

गावाची स्वच्छता करणे म्हणजे मातृभूमीचे ऋण फेडणे होय- स्वच्छतादूत साईनाथ महाराज

गावाची स्वच्छता करणे म्हणजे मातृभूमीचे ऋण फेडणे होय- स्वच्छतादूत साईनाथ महाराज
**********

भोकर( तालुका प्रतिनिधी) मातृभूमीने आपल्यासाठी सर्व काही दिलेले आहे पाणी दगड माती वृक्ष अशा अनेक गरजा भागविल्या जातात गावाची स्वच्छता करणे म्हणजे मातृभूमीचे ऋण फेडणे होय असे विचार महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत साईनाथ महाराज बितनाळकर यांनी बेंबर ता.भोकर येथे स्वच्छता अभियान प्रसंगी बोलताना मांडले.
तालुक्यातील मौजे मेंबर येथे 18 एप्रिल रोजी नव्यानेच महाराष्ट्र शासनाकडून स्वच्छता दूत म्हणून नेमणूक झालेले राष्ट्रसंत गुरुवर्य साईनाथ महाराज बितनाळकर यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले प्रारंभी भजन दिंड्याच्या गजरात महाराजांचे स्वागत झाले त्यानंतर बोलताना स्वच्छता दूत साईनाथ महाराज म्हणाले रोगापासून मुक्त होण्यासाठी गाव स्वच्छ केले पाहिजे, गावामध्ये वृक्ष लागवड करून जोपासना केली पाहिजे, आपले गाव हागणदारी मुक्त करा, आपल्या मुलांना शिक्षण देऊन संस्कारक्षम बनवा, व्यसनापासून दूर रहा, पावसाचे पडणारे पाणी आडवा जमिनीत जिरवा, अंधश्रद्धेपासून दूर राहा आपल्या मुलांना सैनिकी शिक्षण द्या मानवता धर्म जोपासून गावाची सेवा करा असेही शेवटी महाराज म्हणाले माजी सभापती गोविंद बाबागौड,पत्रकार बी. आर. पांचाळ प्रहारचे ता. अध्यक्ष एड. शेखर कुंटे, माधवराव अमृतवाड आदींनी यावेळी विचार मांडले त्यानंतर हनुमान मंदिरापासून महिला व पुरुषांनी दत्त नामाचा गजर करीत हातात झाडू घेऊन गावातील मुख्य रस्ते झाडून काढले या कार्यक्रमास सपोनी शैलेश औटी, ॲड. संतोष भोसले, नागोराव दंडे, जयराम पाटील यांच्यासह गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने हजर होते सूत्रसंचालन अंबादास आटपालवाड यांनी केले तर आभार अत्रिक पाटील मुंगल यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button