व्यसनांचा त्याग करा जीवन अमृतमय होईल- स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज

व्यसनांचा त्याग करा जीवन अमृतमय होईल- स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज
************
भोकर (तालुका प्रतिनिधी) जोपर्यंत अध्यात्माची कास धरणार नाही तोपर्यंत सर्वांगीण विकास होणार नाही, आज कालची पिढी लहान वयामध्ये सुद्धा व्यसनाधीन होत चाललेली आहे ही वाईट परिस्थिती बनली असून व्यसनांचा त्याग करा तेव्हाच जीवन अमृतमय होईल असे आध्यात्मिक विचार परमपूज्य बालयोगी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांनी श्रीदेवी भागवत कथेमध्ये हळदा येथे बोलताना मांडले.
तालुक्यातील मौजे हळदा येथे 9 मार्च पासून श्री देवी भागवत कथा, अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून 15 मार्च रोजी समारोपीय कथा प्रसंगात बोलताना प.पु .बालयोगी गजेंद्र चैतन्य जी महाराज पुढे म्हणाले शिक्षणाने सर्वांगीण परिपक्वता येत नाही अध्यात्मिक व धार्मिक परंपरेची जोड लावावी लागते आजच्या काळामध्ये लहान मुले सुद्धा व्यसनाधीन होत चालली आहेत,जुगार खेळले जात आहेत, वाईट व्यसने जडली आहेत अनेक युवा मुलांचा अपघातात मृत्यू होत आहे म्हणून दारूच्या व्यसनापासून दूर राहा, भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा, भगवंताचे नामस्मरण करा, परमात्मा शिवाय कोणीच मोठा नाही, तुम्ही त्याचा दास व्हा तो तुमचा दास होईल,संतांचे विचार अंगीकारले तर जीवनात क्रांती घडते, मनामध्ये पवित्र भाव ठेवून भक्ती करा ज्यांनी तुमच्या भविष्यासाठी आपल्या जीवनामध्ये कष्ट सोसले रात्रंदिवस काम केले त्या आई-वडिलांच्या सेवेसाठी तत्पर रहा, त्यांची सेवा करा संतांनी आपल्यासाठी खूप काही करून ठेवले त्याचा सदुपयोग करा, सर्वांनी एकत्र येऊन गावाची प्रगती करा, चांगल्या विचाराने चालले पाहिजे यासाठी प्रयत्न करा असे सांगून नवरात्र मध्ये देवीचे पूजन अत्यंत महत्त्वाचे आहे मनोभावे पूजा करावी लागते जीवनामध्ये सत्संग करा चांगल्या गोष्टीची सवय लावून घ्या असे हे शेवटी स्वामीजी म्हणाले ग्रंथाचे पूजन करून समारोप करण्यात आला ग्रंथाचे दर्शन सर्वांनी रांगेमध्ये घेतले