जलसंधारणाची कामे नसल्याने सोसाव्या लागताहेत टंचाईच्या झळा

जलसंधारणाची कामे नसल्याने सोसाव्या लागताहेत टंचाईच्या झळा…
**************
10 वर्षापूर्वी “जलयुक्तशिवार” अभियानातील जलसंधारण कामामुळे बहरलीहोतीशेती:
*****************
पाणी पातळीतही झाली होती वाढ
******************
राज्यातील 22 जिल्ह्यातील 188 तालुक्यात 2234 गावांमध्ये दिसून आली कामांची “फलश्रुती”
*************
भोकर (बी.आर. पांचाळ) : पावसाचे पडणारे पाणी अडविले पाहिजे जमिनीत जिरविले पाहिजे यासाठी” पाणी अडवा पाणी जिरवा” मोहीम शासनाच्या वतीने राबविण्यात आली होती10 वर्षांपूर्वी 2014 साली शासनाने जलयुक्त शिवार अभियान प्रभावी व व्यापकपणे राबवून जलसंधारणाची कामे हाती घेतलेली होती, त्यामुळे विहिरी, नदी, नाले, तलावांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती, हिरव्यागार शेतीच्या बागाही फुलल्या होत्या, गावे टँकर मुक्त झाली होती मात्र त्यानंतर सदर योजना थांबल्यामुळे पुन्हा अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या, विहिरी नदी नाल्यांची पाणी पातळी खाली गेली, ही परिस्थिती दूर करण्यासाठी पुन्हा” जलयुक्त शिवार” अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणे काळाची गरज बनली आहे.
टंचाई मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्यात एकात्मिक पद्धतीने जलयुक्त शिवार अभियान राबविले गेले 5 डिसेंबर 2014 रोजी शासनाने स्वतंत्र निर्णय काढून हे अभियान राबविले, शासनाचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प ठरला होता. पावसाचे पाणी गावाच्या शिवारात आडविणे, भूगर्भातील पाणी पातळी वाढविणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, भूजल अधिनियमांची अंमलबजावणी करणे, राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची शाश्वतता निर्माण करणे, जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढणे, पाण्याच्या ताळेबंदा बाबत प्रभावी जनजागृती करणे, वृक्ष लागवडीस प्राधान्य देणे दुष्काळावर मात करून अन्नस्त्रोतांची उपलब्धता करणे असे महत्त्वाचे उद्देश सदर योजनेचे होते
कामांची झाली फलश्रुती: पाणी पातळीतही झाली वाढ
*********************
राज्यातील 50 टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचे विकेंद्रीकरण साठे तयार झाले,जलसंधारण व मृदसंधारण झाले, तलावातील गाळ काढण्यात आला, 10 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न झाले, जनतेने या कामाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे गावे टँकर मुक्त झाली, दुष्काळ मुक्त झाली, 2016 पासून दोन कोटी वृक्ष लागवड सुरू करण्यात आली, विहिरी नदी नाल्यांना पाणी साठून राहिले कंपार्टमेंट बंडिंग, ढाळीचे बांध, शेततळे, मातीनाला बांध, समतालसलगचर, सिमेंट काँक्रेट बंधारे, नाला खोलीकरण, रुंदीकरण, जुन्या जलसंरचनेचे पुनरुजीवन, अस्तित्वात असलेल्या लपा बंधारे, केटीवेअर, साठवण बंधारा, खोलीकरण रुंदीकरण करणे, पाझर तलाव, लघु सिंचन तलाव दुरुस्ती व नूतनीकरण करणे, पुढे नाले जोड प्रकल्प पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत बळकट करणे अशा कामांमुळे पाणी पातळी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली
पुन्हा जलयुक्त शिवार अभियान कामांची मोठी गरज
***************
10 वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्यात राबवीलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे दोन मीटर पेक्षा अधिक पाण्याचा साठा वाढला होता, गावे टँकर मुक्त झाली होती, अनेक गावांची पाणीटंचाई दूर झाली होती, हिरवी शेती दिसून येत होती आज मार्च 2025 सालच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे, विहिरी,नदी नाल्यांची पाणी पातळी खाली गेली, जानेवारी महिन्यापासूनच काही गावांना पाणीटंचाई जाणवू लागली, दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली या सर्व बाबींवर मात करण्यासाठी आता पुन्हा महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियाना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे तेव्हाच पाणीटंचाई समस्या दूर होऊ शकते जलसाठ्यामध्ये वाढ होऊ शकते शेती हिरवी होऊ शकते भोकर तालुक्यात मागील दहा वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे अनेक गावांच्या पाण्यासाठी वाढ झाली होती बेंबर, हाडोळी, लामकानी, बटाळा, मोघाळी, रेणापूर यासह अनेक गावात हिरवीगार शेती दिसून येत होती टँकर मुक्त तालुका करण्यात आला होता म्हणून आता पुन्हा जलयुक्त शिवार अभियान राबविणे काळाची गरज बनली आहे