सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशेती विषयीसरकारी योजनासामाजिक कार्य

भोकर उपविभागीय कार्यालयासमोर सुधा प्रकल्पग्रस्त 10 शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू

भोकर उपविभागीय कार्यालयासमोर सुधा प्रकल्पग्रस्त 10 शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू
*****************
भूसंपादित जमिनीचा मावेजा देण्यासाठी शासनाकडून टाळाटाळ
***************

भोकर (तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या सुधा प्रकल्पाची उंची वाढविण्यासाठी 6 गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्या असूनही अतिरिक्त भूसंपादनाचा मावेजा शासनाकडून मिळाला नसल्याने भोकर उपविभागीय कार्यालयासमोर 9 जून पासून 10 शेतकऱ्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
भोकर तालुक्यातील सर्वात मोठा असलेला रेणापूर सुधा प्रकल्प आहे सिंचन क्षेत्र कमी होत असल्यामुळे तलावाची उंची 1.10 मीटरने वाढविण्याच्या कामास शासनाची मंजुरी मिळाली, त्या कामाला सुरुवात देखील झाली मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीतीक्षेत्रामध्ये गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मावेजा मात्र शासनाने अद्यापही दिलेला नाही 3 वर्षांपूर्वी पासून शासनाने जमीन ताब्यात घेतली मात्र शेतकऱ्यांना मावेजा देण्यास टाळाटाळ केली जात आहे यापूर्वी शेतकऱ्यांनी अनेक वेळा निवेदने देऊन सुद्धा शासनाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही धरण क्षेत्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता त्यावेळी उपविभागीय अधिकाऱ्याकडून मावेजा लवकर देण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले होते परंतु अद्यापही शासनाने शेतकऱ्यांना मावेजा दिलेला नाही, किनाळा बटाळा, बोरगाव, रेनापुर, सोमठाणा,थेरबन अशा 6 गावातील शेतकऱ्यांच्या 37.7 हेक्टर जमिनी अतिरिक्त भूसंपादित करण्यात आले आहेत शेतकऱ्यांना रस्ते राहिलेले नाहीत,प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात आले नाही गोदावरी पाटबंधारे विभाग महामंडळ तथा विष्णुपुरी प्रकल्प विभाग यांनी 50% अवार्ड स्वरूपात मावेजा देण्यात येईल उर्वरित मागण्या 31 मे च्या पूर्वी पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले होते परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची घोर फसवणूक करण्यात आली त्यामुळे सर्व शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत 100% जमिनीचा मावेजा देण्यात यावा या मागणीसाठी पांडुरंग सूर्यवंशी, शिवाजी हुबेवाड,शंकर नवटके, माधव देवकर,नईमुद्दीन शेख,वही दो दिन शेख, सलीम कुरेशी, नारायण अर्कलवाड आधी दहा शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांना पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश्वर देशमुख, शिवसेनेचे सुभाष नाईक, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बी. आर.पांचाळ नागोराव शेंडगे, ज्येष्ठ पत्रकार एल.ए.हिरे, दिलीप तिवारी यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवून शासनाने मागणीचा तात्काळ विचार करावा असे मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन संपादक उत्तम बाबळे यांनी करून आभार मानले, शासनाने मागण्या लवकर मान्य नाही केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button