सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रग्रामीण वार्तासामाजिक कार्य

जनाबाई खराणे यांचा वारकरी दिंडी उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्रथम पुरस्काराने सन्मान

जनाबाई खराणे यांचा वारकरी दिंडी उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्रथम पुरस्काराने सन्मान
***********

भोकर (तालुका प्रतिनिधी) वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित 13 वे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन शिर्डी येथे नांदेड जिल्हा वारकरी साहित्य परिषद महिला विभाग यांनी उत्कृष्ट वारकरी दिंडीचे संचलन केल्याबाबत प्रथम पुरस्कार देऊन जिल्हाध्यक्षा जनाबाई खराने यांचा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शिर्डी येथे 22 व 23 मार्च 2025 रोजी अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वारकरी शाखांना निमंत्रित करण्यात आले होते वारकरी दिंडीचे उत्कृष्ट सादरीकरण व जिल्ह्यात वारकरी साहित्य परिषदेचे काम चांगल्या पद्धतीने केल्यामुळे प्रथम पुरस्कार देऊन नांदेड जिल्हा महिला अध्यक्षा जनाबाई प्रभाकरराव खराणे यांचा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विठ्ठल काकाजी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष महाजन महाराज, उपाध्यक्ष बी. आर. पांचाळ, कार्याध्यक्ष सुधाकर महाराज व वारकरी साहित्य परिषदेच्या सर्व शाखांनी अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button