सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रक्राईम वार्ताग्रामीण वार्ताचालू घडामोडीताज्या बातम्यासरकारी योजना

उदगीर शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली – प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे परिस्थिती जैसे थे!

उदगीर शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली – प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे परिस्थिती जैसे थे!

उदगीर | प्रतिनिधी

उदगीर शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ढासळली असून, बेकायदेशीर ऑटोरिक्षा, अतिक्रमण, बंद वाहतूक सिग्नल आणि वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नव्याने सुरू झालेल्या MH 55 RTO कडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

MH 55 RTO निष्क्रिय – बेकायदेशीर वाहतूक बिनधास्त सुरू!

उदगीरमध्ये MH 55 RTO कार्यरत असतानाही शहरात परवान्याशिवाय धावणाऱ्या ऑटोरिक्षांची संख्या वाढली आहे. अनेक रिक्षाचालकांकडे परवाने नाहीत, तर काहीजण वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करत आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन धावणाऱ्या रिक्षांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.

वाहतूक पोलिस अपुरे – सिग्नल बंद, वाहतुकीचा बोजवारा!

शहरातील प्रमुख चौकांवरील वाहतूक सिग्नल अनेक महिन्यांपासून बंद आहेत.यामुळे वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहन चालवत असून, वाहतुकीत शिस्त राहिलेली नाही.वाहतूक पोलिसांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे चौकांमध्ये कुठेही नियंत्रण दिसून येत नाही.रस्त्यांवर वाहने एकमेकांना आडवी जात असल्याने वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते.

उदगीरमध्ये वाहतूक नियंत्रणाचा अभाव; अपघातांचे प्रमाण वाढले

 शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक नियंत्रणाचा अभाव आणि वाढती गर्दी यामुळे अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.शहरातील प्रमुख चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बंद पडली असून, वाहतूक पोलिसांची संख्याही अपुरी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष होत असून, सुसाट वेगाने वाहने चालवल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे.स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक संघटनांनी यासंदर्भात प्रशासनाला वारंवार निवेदने दिली आहेत. परंतु अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. नागरिकांकडून मुख्य चौकांमध्ये सिग्नल कार्यान्वित करणे, वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे आणि वेग नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी होत आहे.प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर येत्या काळात याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

महिनाभरापूर्वी अतिक्रमण हटवले, पण परिस्थिती जैसे थे!

उदगीर नगरपालिकेने महिन्यापूर्वी मोठा गाजावाजा करत अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली होती. मात्र, आज पुन्हा शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत अतिक्रमणाचा सुळसुळाट झाला आहे.फुटपाथ व्यापाऱ्यांनी पुन्हा बळकावले असून, नागरिकांना चालण्यासाठीही जागा नाही.हातगाडीवाले, अनधिकृत गाळे आणि दुकानांनी रस्ते पुन्हा व्यापले आहेत.वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे थे राहिला आहे, प्रशासन फक्त दिखावू कारवाई करून मोकळे झाले आहे.

प्रशासन जबाबदारी टाळतंय – नागरिक संतप्त!

MH 55 RTO, वाहतूक विभाग आणि नगरपालिका हे एकमेकांवर जबाबदारी ढकलत असून, वाहतूक सुधारण्यास कोणीही पुढाकार घेत नाही. नागरिक वारंवार तक्रारी करत असले तरी परिस्थिती जैसे थेच आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी खालील उपाययोजना त्वरित कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

बंद वाहतूक सिग्नल त्वरित दुरुस्त करावेत.

MH 55 RTO ने बेकायदेशीर ऑटोरिक्षांवर कठोर कारवाई करावी.

वाहतूक पोलिसांची संख्या वाढवून वाहतूक नियंत्रण प्रभावी करावे.

नगरपालिकेने अतिक्रमण हटवण्याची मोहीम केवळ दिखावूपणासाठी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button