सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
आपला महाराष्ट्रग्रामीण वार्ताशेती विषयी

उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी जीवाची होते लाही… लाही…

उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी जीवाची होते लाही… लाही….

ग्रामीण भागात पाणीटंचाईमुळे महिला व नागरिक त्रस्त शहरात रसवंती, ज्यूससेंटर सह थंड पेयाची दुकाने थाटली 

भोकर(बी. आर. पांचाळ) एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा चांगलाच वर चढला असून उन्हाळ्याच्या तीव्र झळानी जनजीवन विस्कळीत झाले आहे सकाळी 10 वाजल्यानंतर ऊन तापायला लागले आहे ऐन दुपारच्या वेळी सूर्य आग ओकु लागलाय…… घराच्या बाहेर निघणे देखील अवघड झाले आहे मानवी जीवाची लाही लाही होत असून ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत.
चालू वर्षी परतीचा पाऊस अधिक झाला असल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे जमिनीत पाणी मात्र साठवून राहिले नाही परिणामी जानेवारी महिन्यापासूनच विहिरी नदी नाले तलावांची पाणी पातळी खाली गेली, मार्च महिन्यामध्ये तर अनेक विहिरी नद्या नाले कोरडी पडली जाकापूर,पोमनाळा गावामध्ये पाणीटंचाईला सुरुवात झाली, नळ योजनेचे पाणी येत नसल्याने काही अंतरावरून लोकांना पाणी आणावे लागत आहे शासनाकडे मागणी करून देखील वेळेवर उपाययोजना होत नाहीत त्यामुळे महिला व नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे शासनाने जानेवारी ते मार्च पर्यंतचा पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर केला असला तरी प्रत्यक्षात कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाही अधिग्रहण करण्यात आलेल्या विहिरीचे पाणी देखील आटले आहे त्यामुळे भोकर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा तडाखा बसला आहे.

उन्हाळ्याच्या तीव्र झळानी ग्रामीण भागावर “अवकळा”
*************

ग्रामीण भागातील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त आहेत समंदरवाडी, बोरवाडी, पोमनाळा, जाकापूर,मालदरी देवठाणा, लामकानी, मसलगा, कासारपेट यासह 16 गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, आजूबाजूच्या विहिरींना देखील पाणी नाही, नद्या, नाल्या, बोअर आटले आहेत अशाही परिस्थितीत ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर,रोजंदारी, कामगार उन्हाळ्यामध्ये काम करण्यासाठी जातात उन्हाची परवा न करता शेतामध्ये काम करतात शेतामध्ये असणारे झाड हाच त्यांचा आसरा आहे शेताची पूर्व पावसाळी कामे सुरू झाली असून नांगरणी, वखरणी,कचरा वेचने आदी कामांना सुरुवात झाली आहे मजुरांच्या हाताला कामे नसल्यामुळे अनेक गावातील मजुरांचे परप्रांतात स्थलांतर झाले आहे जिथे काम मिळेल तिथे मजूर वर्ग बाहेर राज्यात कामाच्या शोधात फिरतो आहे तीव्र उन्हाळ्याच्या झळानि ग्रामीण भागावर अवकाळा पसरली असून मानवी जीवन विस्कळीत झाले आहे उजाड झालेल्या माळ रानात उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवतात गुराढोरांना देखील प्यायला पाणी नाही जंगलातील पशु प्राणी पाण्यासाठी भटकत आहेत तीव्र उन्हाळ्यामुळे एकूणच जनजीवनावर परिणाम झाला आहे

शहरात थाटली रसवंती, ज्यूस व थंड पेयाची दुकाने
***********

शहरांमध्ये उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या थंड पेयाची दुकाने थाटली आहेत आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, कुल्फी, बदाम शेक, उसाचा रस, लस्सी, ज्यूस सेंटर अशा प्रकारची थंड पेयाची दुकाने थाटली आहेत, थंड पाण्याचे जार,थंड पाण्याची बाटली अशा अनेक थंडपेयाच्या पदार्थाने शहरातील नागरिक उन्हाळा घालवण्याचा प्रयत्न करतात ग्रामीण भागातील नागरिक मात्र उन्हाच्या वेळी झाडाखाली बसणे माठातील थंड पाण्याचा उपयोग करणे अशाप्रकारे उन्हाळा घालवतात शहरात कुलर पंखे वातानुकूलित मशीन वापरून उन्हापासून संरक्षण करतात मात्र ग्रामीण भागातील शेतकरी उन्हामध्ये काम करत असतो त्यास शहरातील सुख सुविधा कुठून मिळणार आहेत? उन्हामुळे ग्रामीण जीवनावर मात्र अवकाळा पसरलेली दिसून येते कुलर पंखे खरेदी करणे बाजारात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तीव्र उन्हाळा घालवण्यासाठी नागरिकांत दुपारच्या वेळी घराच्या बाहेर निघणे टाळत आहेत एकूणच तीव्र उन्हाळ्यामुळे शहरी व ग्रामीण जनजीवनावर परिणाम झालेला दिसून येतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button