भोकर तालुक्यात पाणीटंचाई निवारणार्थ 50 विंधन विहिरी मंजूर मात्र प्रत्यक्ष काम अद्यापही सुरु नाही

भोकर तालुक्यात पाणीटंचाई निवारणार्थ 50 विंधन विहिरी मंजूर मात्र प्रत्यक्ष काम अद्यापही सुरु नाही
**********
पाणीटंचाईची कामे तात्काळ सुरू करा- बाळासाहेब पा. रावणगावकर यांची मागणी,
***********
भोकर( तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा शासनाने मंजूर केला तालुक्यात 50 ठिकाणी विंधन विहिरी मंजूर झाल्या मात्र काम अद्यापही सुरू झालेले नाही पावसाळा 15 दिवसावर येऊन ठेपला आहे लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे टंचाईची कामे कधी होणार आहेत? भोकर तालुक्यातील पाणीटंचाई निवारणार्थ मंजूर झालेली कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी केली आहे.
भोकर तालुक्यातील पाणीटंचाई निवारणार्थ जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून असा पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर झाला आहे 3 कोटी 60 लाख रुपये या आराखड्यासाठी मंजूर झालेले आहेत मात्र पाणीटंचाईच्या तीव्र झळा वाडी तांड्यावर जाणवत असताना टंचाईची कामे सुरू झाली नाहीत पावसाळा 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवीन विंधन विहिरी घेणे, विहीर बोअर अधिग्रहण नळ योजनांची विशेष दुरुस्ती, नवीन नळ योजना, विंधन विहिरींची दुरुस्ती अशी अनेक कामे टंचाईसाठी मंजूर झालेली आहेत मात्र सदर कामे सुरुवात झालेली नाहीत तीव्र उन्हाळा जाणवत असताना वाडी तांड्यावर गावावर लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे अधिग्रहण केलेल्या विहिरींना पाणी नाही काही गावांमध्ये टँकर सुरू झाले आहे मात्र एक टँकर गावाला पुरत नाही त्यामुळे जवळपास जिथे मिळेल तिथून लांब अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये म्हणावी तशी पाण्याची व्यवस्था अद्यापही झालेली नाही, लोकांना मात्र भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
50 विंधन विहिरी झाल्या मंजूर मात्र काम सुरु नाही
***********
भोकर तालुक्याच्या पाणी टंचाई निवारणार्थ जानेवारी ते मार्च टंचाई आराखड्यासाठी 50 विंधन विहिरींची मंजुरी मिळालेली आहे मात्र मे महिन्याच्या 18 तारखेपर्यंत कामास अजूनही सुरुवात झालेली नाही पावसाळा 15 दिवसावर येऊन ठेपलेला असतानाही ही कामे सुरुवात झाली नाही मग कामे कधी सुरुवात करण्यात येणार आहेत? लोकांना पाणीटंचाईसाठी काय उपयोग होणार आहे पाणीटंचाईसाठी मंजूर झालेली कामे सुरुवात का झाली नाहीत असा सवाल ग्रामीण भागातील नागरिक उपस्थित करीत आहेत
टंचाईसाठी मंजूर कामे त्वरित सुरु करा- रावणगावकर
***********
भोकर तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध कामे मंजूर करण्यात आलेली आहेत मात्र ती कामे प्रत्यक्षात अजूनही सुरुवात झालेली नाहीत विंधन विहिरी 50 मंजूर झालेले असतानाही अद्यापही काम सुरू झालेले नाही काही दिवसावर पावसाळा येऊन ठेपलेला असताना विंधन विहिरींची कामे कधी होणार आहेत पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत असून शासनाने मंजूर केलेला कृती आराखडा प्रत्यक्ष कामाला तात्काळ सुरुवात करावी व पाण्यासाठी होणारी नागरिकांची पायपीट थांबवावी मंजूर कामे त्वरित सुरू करण्यात यावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी केली आहे